यावेळी हजारोच्या संख्येने लोकसमुदाय उपस्थित होता. आपल्या भाषणात पुढे बोलत असताना भगीरथ दादा भालके म्हणाले - हजारो कोटींचा निधी फक्त कागदावर आणला आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशा उमेदवाराला मतदार धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.
शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव मिळावा म्हणून शेतकरी आंदोलन करत असताना. तोंड बंद करून बसणार्या या लोकप्रतिनिधीला शेतकर्याच्या पीकाची काळजी नाही. या बाबत कधीही विधान भवनात तोंड उघडलेलं नाही. शेती मालाचा प्रश्न असो की भाटगरच्या पाण्याचा प्रश्न असो. कधीही शेतकर्याची बाजू घेतली नाही. मतदार बंधू भगिनीना येत्या 20 तारखेला अशा बिनकामाच्या लोकप्रतिनिधीला बदलण्याची वेळ आली आहे.
आताची ही निवडणूक कुण्या नेत्यांच्या हातात राहिली नाही. जनतेच्या हातात ही निवडणूक गेली आहे. मतदार आता बदल घडवल्या शिवाय राहणार नाहीत. असे काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आपल्या प्रचारसभेत मतदारांना संबोधित करताना म्हणाले. यावेळी आमदार कै. भारत नानांवर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते, भगीरथ दादा प्रेमी मंडळी उपस्थित होते.

