पाण्याच्या पाच मोटरी एक मोटर सायकल आणि स्वामी दत्तकृपा दिंडीतील ट्रॅक्टर असा एकूण 11 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावी दिनांक 30/6/2025 रोजी फिर्यादी नामे रुपेश अजितराव देवकते वय 27 राहणार घोसाळे यांच्या मालकीच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पाण्याच्या मोटरी चोरीस गेल्या बाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजी नंबर 544/25BNS 303 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या तपास कामी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांनी त्वरित प्रभावाने शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण चार आरोपींची नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास करून एकूण पाच शेती पंपाच्या पाण्याच्या मोटरी किंमत रुपये दोन लाख पंधरा हजार व एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख 35 हजार (235000) रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला असून आणखीन सदर मोठा चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस तपास करत आहेत.
तसेच वेळापूर येथील आषाढी वारीच्या वेळेस दोन जुलै 2025 रोजी महिंद्रा कंपनीचा स्वामी दत्तकृपा दिंडीतील वारकरी दिंडी पालखी मधील ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर मौजे चळे या गावातून जप्त केलेला आहे. याबाबत वेळापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 251/ 25 बी एम एस कलम 303 2 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व पाण्याच्या शेतीपंपासाठी वापरणाऱ्या मोटरी एकूण पाच तसेच एक मोटरसायकल असा एकूण 11 लाख रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर बाबत वेळापूर पोलीस स्टेशन येथे पुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, सहाय्यक फौजदार शेंडगे, पोलीस हवालदार घंटे, पोलीस हवालदार सय्यद, बालाजी कदम, सुधीर शिंदे, दीपक भोसले, सुहास देशमुख, गजानन माळी, सागर गवळी, चालक पोलीस कॉन्स्टेबल नदाफ, गोडसे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.

